कुंभमेळ्याच्या बैठकीत सहभागी करून घ्या   

शेतकर्‍यांची मागणी

मुंबई : आगामी काळात नाशिकमध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा आमच्याच जमिनीवर भरतो, मात्र आम्हाला का डावलता? कुंभमेळ्यासाठी शेत जमिनी आरक्षित झालेल्या शेतकर्‍यांनी सरकारला सवाल विचारत कुंभमेळ्याच्या नियोजन बैठकीत सहभागी करून घेण्याची मागणी केली आहे. 
 
सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. येत्या १ जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक होणार आहे. या बैठकीत आमची भूमिका मांडण्यासाठी सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.कुंभमेळ्यासाठी तपोवनातील जागेवर वेगवेगळ्या आखाड्यांसाठी साधू ग्राम उभारले जातात. २०१२ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन आरक्षित करण्यात आली. मात्र १२ वर्षानंतर देखील केवळ २० टक्केच जमीन भूसंपादित करण्यात आली. शेत जमिनीवर भूसंपादनाचे आरक्षण असल्याने शेतकर्‍यांना ना तिथे शेती करता येते, ना विकास. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. 

जमिनीचा मोबदला देण्याची मागणी

आगामी कुंभमेळ्याची जय्यत तयारी होत असून शाहीस्नानाच्या तारखा देखील निश्चित केल्या जाणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या प्रत्येक बैठकीत शेतकर्‍यांना सहभागी करून घेण्याची मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे. यासोबतच जमिनीचा मोबदला देखील देण्याची मागणी १६३ शेतकर्‍यांनी केली. 

शेतकरी नाराज

सरकारने जमिनीचा रोख मोबदला द्यावा; तसेच कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या प्रत्येक बैठकीत शेतकर्‍यांना सहभागी करून घ्या, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. १२ वर्षानंतर केवळ २० टक्केच जमीन भूसंपादित करण्यात आली. शेत जमिनीवर भूसंपादनाचे आरक्षण असल्याने शेतकर्‍यांना ना तिथे शेती करता येते, ना विकास. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे|
 

Related Articles